आयुष्यातील रंग

Friday 24 July 2020

..क्रिकेट
करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा करणारा खेळ"
याच खेळात कित्येक खेळाडू होऊन गेलेत. प्रत्येकाचं योगदान मोठा या खेळासाठी. त्या त्यातील एक खेळाडू म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील जवळजवळ प्रत्येक रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.शतकाचे महा शतकापर्यंत खूप मोठे रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्या यशामागील मेहनत पण तितकीच महत्त्वाची आहे. आणि अपयश पण तितकाच महत्त्वाचा आहे सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट कारकिर्दीत मध्ये तब्बल 39 वेळा आउट नसतानाही अंपायर द्वारा आउट दिले गेलेले आहेत.पण कधीच अंपायर सोबत भांडण नाही की एक शब्द सुद्धा न बोलता सचिन प्रत्येक वेळी ग्राउंड सोडत असे.कदाचित याच कारणाने सचिन महान खेळाडु होऊ शकला..
आयुष्य जगत असताना आपण किती बरोबर आहे पण..डिसीजन देणाऱ्या हंपायरचा निर्णय चुकला असेल तर त्याची किंमत काय असते हे फक्त त्या महान खेळाडू ना माहीत असते जे चुक नसताना किंवा out नसताना ही out दिले गेलेलं आहेत ...
आपलं आयुष्य पण असच असत आपण आयुष्य जगत असताना आपण बरोबर असतो पण पण जर डिसीजन देणाऱ्या हंपायर न जर निर्णयच चुक दिलेला असेल तर मग त्या पुढे कोणतंच लॉजिक काम करत नसत
मला कोणी तरी विचारल होत की आयुष्यात जर एकाद्या महान वक्ती प्रश्न विचारण्याची संधी तुम्हाला भेटली तर तो वक्ती कोण असेल आणि त्याला काय प्रश्न विचारावर ?
त्यावर माझं उत्तर एकच असेन " मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्रश्न तर तो हाच असेल की क्रिकेट कार कीर्ती मध्ये 39 वेळा out दिल गेलं त्या बद्दल तुम्हाला काय वाटत ??

Thursday 2 July 2020







पंढरीची वारी...!


 वारी: एक अविस्मरणीय अनुभव (अनुभव लेखन)*
*शब्दांकन:- दिपक जाधव*

"वाट ती चालावी पंढरीची"



"वारी हा असा सोहळा"आहे जिथे कोणालाच आमंत्रण देण्याची गरज नसते" पावसाळा सुरू झाला की"आषाढी च प्रत्येक "वारकऱ्यांला वेड लागत ते पंढरपूर च्या विठुरायाच"
"वारकरी हा जगातीलअसा संप्रदाय आहे जिथे जगातील प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे लोक बघायला भेटतील"
"आषाढात होणारा हा अभूतपूर्व सोहळा अभुतपुर्व असाच असतो
"संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,निवृत्तीनाथ महाराज यान सारख्या अनेक संतांच्या अनेक पालख्या पंढपुर ला मार्गस्थ होतात,त्या पालख्यांसोबत असंख्य वारकरी हातात टाळ वीणा घेऊन भक्ती भावाने कित्येक दिवस पाई प्रवास करूनही अगदी न थकता पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी  भक्तिमय वातावरणात,विठुरायाच्या भजनात तल्लीन होऊन चालत असतात.
त्यात मी अनुभवलेली वारी म्हणजे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा, ज्ञानोबा माऊलींचे थोरले बंधू आणि वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु म्हणून त्यांची ओळख आहे निवृत्तीनाथ महाराज च्या संजीवन समाधी मंदिरातून पालखी सोहळ्याचे प्रस्थान होते पवित्र कुशावर्त तीर्थावर पूजा विधी होतो या सोहळ्यासाठी आजूबाजूच्या सर्वच क्षेत्रातून सर्व वारकरी बंधु अगदी मोठ्या उत्साहाने उपस्थित होतात, हजारोच्या संख्येने आलेले हे वारकरी मोठ्या भक्तिभावाने आलेले असतात प्रत्येकाला तिथुन निघाल्यानंतर आस फक्त एकच असते पंढरीच्या विठुरायाची.....

पालखी प्रस्थान झाल्यानंतर पुढील नियोजन सुद्धा खूप पद्धतशीरपणे केलेले असते त्यात वारकऱ्यांचे जेवण पुढील मुक्काम सर्वकाही ठरलेल्या पद्धतीने होत असते शेकडो किलोमीटर पायी चालत असताना प्रत्येक वारकऱ्याच्या हातात टाळ आणि मुखात पंढरीच्या विठूरायाचं स्मरण असतं अगदी शेकडो किलोमीटर पायी चालून सुद्धा कोणत्याही वारकऱ्याच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, या वारीमध्ये तरुण वर्ग खूप मोठ्या संख्येने सहभागी होतात.......

वारीमध्ये सर्वात जास्त महत्व "रिंगण सोहळ्याला" ला असते. शेकडो किलोमीटर पायी चालत असताना थोडाफार थकवा येतो तो थकवा या रिंगण सोहळ्यामध्ये पुर्णपणे नाहीसा होतो माऊलींच्या अश्वाचे रिंगण खूप ऊर्जा देणारे असते टाळ मृदुंग आणि ज्ञानबा तुकाराम घोषा मध्ये पूर्ण परिसर भक्तीमय होऊन जातो रिंगण सोहळा अविस्मरणीय असतो सोहळा झाल्यानंतर ठरलेल्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि मग महाप्रसाद असतो महाप्रसाद झाल्यानंतर वारकरी रात्री विश्रांती घेतात, दुसऱ्या दिवसाची दिनक्रिया सुरु होते आंघोळ करून काकड आरती व हरिपाठ घेऊन दुसऱ्या दिवसाची अगदी भक्तिमय वातावरणात सुरुवात होते आणि नंतर महाराजांच्या पालखी पुढे मार्गस्थ होतात व सर्व पालख्या पंढरपुरात येतात .........
पंढरपुरात आल्यानंतर सर्व वारकर्‍यांना वेड असते ते फक्त विठू माऊली च्या दर्शनाचे आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करून चंद्रभागेमध्ये स्नान करून सर्व वारकरी भक्तीभावाने विठुरायाचे दर्शन घेतात शेकडो किलोमीटर व कित्येक दिवस पायी चालून आल्यानंतर विठुरायाचे दर्शन घेतल्यावर चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असतो दर्शन झाल्यानंतर वारकरी हे परत आपापल्या गावी प्रस्थान करतात असाहा सोहळा अविस्मरणीय असतो...आपल्या आयुष्यात पंढरीची वारी ही प्रत्येकाने एकदा तरी नक्की करावी 

जय हरी

https://www.instagram.com/deepakrav_jadhav

Sunday 14 June 2020

https://www.instagram.com/deepakrav_jadhav


पाहिलं प्रेम आणि पहिला पाऊस हा खूप वेगळा असतो जितका आनंद पहिल्या प्रेमात होतो तितकाच आनंद पहिल्या पाऊसात होतो ... प्रेमातले पाहिलपन आणि पाऊसातील पाहिलेपण हे जे त्यावर प्रेम करतात त्यांनाच कळते...

पहिला पाऊस हा वादळी वाऱ्यासह असतो त्यात पडणार-या गारा वेचण्याचा आनंद काही औरच असतो"
आपण ज्या पद्धतीने मित्र-मैत्रिणी किंवा प्रियसीची किंवा नातेवाईक यांची जितकी आतुरतेने वाट बघत असतो तितकीच वाट पहिल्या पाऊसाची बघत असतो,
पहिला पाऊस अचानक पाहुणे आल्यासारखा येतो,आभाळात अचानक दाटून येणारे ते काळेकुट्ट ढग आणि त्यानंतर पक्ष्यांची घरा कडे जाणारे थवे ते दृश्य खूप मनमोहक असते, सुटलेला वारा हा झाडांच्या आकाशात घेऊन जाणाऱ्या फांद्या जणू पाऊसासाठी आमंत्रण देण्यासाठी आकाशात झेपावत असतात,झाडांची सळसळणारी पाणे जणु येणाऱ्या पाऊसाला वाद्य वाजून स्वागत करत करतात, आकाशात होणारी ढगांची दाटी आणि मधेच गडगडाटासह चमकणारी वीज खूप रोमहर्षित करून जाते, पहिल्या प्रेमात उधळणारे रंग आणि पहिल्या पाऊसात उधळणारा तो मातीचा सुगंध मनाला मंत्रमुग्ध करणारा असतो पहिला पाऊस पडून गेल्यानंतर पक्षांचा चिवचिवाट खूप अविस्मरणीय असतो,
पाऊस होऊन गेल्या नंतर पडणारा तो सात रंगांचा  इंद्रधनुष्य  मनमोहक करणार असतो,पहिला पाऊस होऊन गेल्यानंतर रात्री अंगणात बसून आकाशातील चांदण्या बघण्याची मजा काही औरच असते,पहिल्या पाऊसात कौलारू घराच्या छतावरून लागणार्‍या त्या पहिल्या "लवा"ओजळीत कायमच्या साठवुन ठेवु वाटतात....
   याच पहिल्या पाऊसाने लहानपणी च्या कित्येक आठवणी शिदोरी सारख्या बांधून ठेवलेल्या असतात,त्या कितीही पाऊस झाला तरीही वाहून जात नाही,याच पाऊसाने कित्येक कवी निर्माण केलेत याच पाऊसात कित्येकाचे मने "ओली चिंबभिजली"असतील...!

Friday 24 April 2020

सैराट

सैराट 

29 एप्रिल 2016 ला सैराट महाराष्ट्रतील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता येत्या 29 ला त्याला जवळपास 4 वर्ष पूर्ण हिताहेत,,
2016 तस वर्ष खूप छान होत ,आयुष्यात किंवा आजू बाजूला घडणाऱ्या घटना मध्ये लोक तल्लीन होते,
प्रेमी जोडे ना हा चित्रपट खूप आवडला नागराज मंजुळे यांनी  खूप अप्रतिम असा चित्रपट बनवला होता या चित्रपटाची खासियत म्हणजे यातील गाजलेली गाणी खूप अप्रतिम अजय अतुल च संगीत या सर्वांनी चित्रपट खूप अप्रतिम बनवला होता ,,,

प्रेम....
जवळ पास खूप जण असतात आपल्या आयुष्यात प्रेम करतात ,काहीच टिकत काही च तुटून जात हा चित्रपट ही त्यातील होता एक सुंदर देखणी मुलगी व मोठया घरची मुलगी आणि एक सर्वसादरण घरातील मुलगा याची love स्टोरी खूप चित्रपटात असच दाखवलं जात हिंदी चित्रपट मध्ये सुद्धा खूप हे दाखवलं गेलंय याही चित्रपटा मध्ये तेच दाखवलं गेलंय पण हे दाखवताना ग्रामीण भागातील वस्तुस्थिती च भान राखलं गेलंय,,,
विशेष करून जे गाणे बनवले गेले ते खूप सुंदर आहेत त्यावरच चित्रपट जास्त हिट झालाय चित्रपट रिलीज होण्या आधीच या चित्रपटाची गाणी खूप हिट झाली होती....
या चित्रपटा च्या निमित्ताने त्या काळातील माझ्या ही आठवणी ताज्या झाल्यात,,,
प्रेम कोणाला आवडणार नाही करायला या जगात सर्वाना आवडत मी ही चितपट येण्या आधी प्रेमात होतो आणि जवळ आयुष्यातील 4 वर्ष प्रेम करत होतो ,,,,पण चितपट त जस दाखवलं जात तस काहीस आपल्या आयुष्यात पण होत समाज ,त्या समाजातील लोक , घराचे लोक घरच्या लोकांचा विरोध हे सर्व काही होत असत ,,,हा चित्रपट बघितल्या नंतर कित्येक प्रेमीयुगलाच्या तोंडात या चित्रपटचे डायलॉग खूप काळ गाजत राहिले आणि काही प्रेमी या चितपट मुळे खूपच जवळ आले काहीच आयुष्य भराच नात निर्णम केलंय 
....पण याच प्रेमानं काहींना आयुष्यातून कायमच उठवलं आहेत जो पर्यत एखाद नात ठराविक मर्यादेपर्यत केलं जातं तो पर्यत ठीक असत पण जेव्हा मर्यादा सोडल्या जातात तेव्हा कालांतराने त्या प्रेमी ना खूप त्रास सहन करावा लागतो 
जस या चित्रपटात दाखवलं गेलंय की समाज आणि घराचा दबदबा ,याना झुगारून पुढे गेल की त्याचे परिणाम शेवटी काय होतात 
आज या चित्रपट आठवणी न मूळ मी पण माझ्या आयुष्यात परिणाम भोगले आहेत याची पुन्हा आठवण झालीय प्रेम वाईट नसत पण समाज लोक,चालीरीती,आणि पैसा खूप वाईट असतात हे पुन्हा एकदा ध्यानात आलंय 
या चित्रपटात ज्या कलाकारांनी काम केलंय ते खूप सुंदर काम केलंय,चित्रपटात जे डायलॉग आहे ते पण अतिशय सुंदर आहेत त्या मुळेच चित्रपट अतिशय सुंदर बनवला गेलाय ,,,
शाळेतून सुरू होणारी love स्टोरी ही सर्व बधनाना झुगारून एक मुलाच्या संसारा पर्यत जाते यात खूप मोठे चढ उतार होतात,...वाईट प्रसंग वाट्याला येतात,कित्येकांच्या वाट्याला दुःख येत ,काहींचा स्वाभिमान दुखावला जातो ,तर काहीची इजत मातीमलन होते,काहींना प्रेम भेटत तर काहींचा अपेक्षा भंग होतो,हे सर्व चित्रपट मधील काही निवडक मुद्दइ 
चित्रपट मधील संगीत अजय अतुल च आहे त्या मुळे जी गाणी बनवली गेली ती गाणी आज पण तरुणाईच्या मनावर राज्य करताना दिसयेत ,,
deepak jadhav(D. J)

https://marathi.pratilipi.com/story/llju1epgtn8t?utm_source=android&utm_campaign=content_share


Saturday 18 April 2020

सैय्यम

जिद्दी च्या प्रवासात पाण्याचा बर्फ होई पर्यंत सैय्यम असावा लागतो .....

Wednesday 8 April 2020

निसर्ग आणि आपण

छत्रपती शिवराय आणि मावळे जेंव्हा पण किल्ला जिंकत असत तेव्हा त्या किल्यावर गवताच्या गंजीचा पेटून मोठा धूर केला जात असत त्या मागचं कारण अस की गडावर धूर दिसला की दुसऱ्या गडावरील लोकांना हा इशारा असे की मावळे आणि महाराजांनी गड जिकलाय ,हे त्या काळी इशारा किंवा एखादी घटना घडलीय हे दर्शविण्या साठी वापरत आशा कृती करत असत जवळपास छत्रपती शिवराय याचा काळ उलटून 350 वर्ष होऊन गेली आहेत,तो काळ आणि आता आहे हा काळ यात खूप फरक आहे तो असा की 100किलो मीटर लांबून गडा वरून केलेला धूर स्पस्ट दिसत असत कारण त्या काळी आता सारखी औदयोगिक वसाहती नव्हत्या ज्यातून हजारो टन कार्बन सोडला जात आहे,आज कोरोना मुळे देशात लॉक डाऊन होऊन जवळ जवळ 17 वा दिवस आहे आणि या काळात जीवना आवश्यक गोष्टी वेगळ्या तर सर्व काही बंद आहे मग त्यात कारखाने आलेत किंवा वाहन इतर छोटे मोठे उदयोग पण ,आज लॉक डाऊन चा 17वा दिवस आहे आणि येणारा प्रत्येक दिवस सुंदर आणि स्वच्छ हवा घेऊन येत आहे,हवेतील धूळ आणि कार्बन यांचं प्रमाण खूपच कमी झाल्या मुळे दूरवरुन दिसणारे डोगर पण आता स्पष्ट दिसत आहे आमच्या घरा पासून दिसणारा वणी च्या डोगरापासून मार्तंड रावळ्या जावळ्या, पासून तेचांदवड पर्यत सर्व काही डोगर स्पष्ट दिसतायत ,हे सर्व किल्ले किंवा गड फक्त पावसाळ्यात तच पाऊस पडून गेल्या नंतर एवढे स्पष्ट दिसतात एरव्ही मात्र धूळ,होणारे प्रचंड प्रदूषण या मुळे दिसत नाही ,,,,

आज घरात बसलो असताना समोर जेव्हा देवी च्या डोगर स्पष्ट दिसत होता तेव्हा मनात छत्रपती शिवरायांनी वापरलेली युक्ती आठवली जी किल्ला जिकल्या नंतर मावळे करत असे ,गवताच्या गंजी चा धूर "जो कित्येक मैल दूर दिसत असे त्या भरून त्या काळात किती हवा शुद्ध आणि गड खूप दूरदूर पर्यत स्पष्ट दिसत असे हे समजते ....….




"निसर्ग आणि आपण", वाचा प्रतिलिपि वर :

https://marathi.pratilipi.com/story/0fyukahbzgbc?utm_source=android&utm_campaign=content_share